शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.... शेतरस्त्याची नोंद लागणार आता ७-१२ उताऱ्यावर

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,शेतात जाणाऱ्या शेतरस्त्याची नोंद आता ७-१२ थेट उताऱ्यावर इतर हक्कात लागणार आहे.यामुळे शेतातील रस्त्यासंबधात होणारे वाद आता कायमस्वरूपी संपणार आहेत.याबाबत २२ मे २०२५ रोजीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने शेतरस्ता उपलब्ध करून देणे व ७-१२ उताऱ्याच्या इतर हक्क सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी, प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिले आहेत.या शासन निर्णयानुसार 
💥रस्त्याची रुंदी ३ ते ४ मीटर असणे 
💥रस्ता कलम १४३ व कलम ५ नुसार दिलेल्या रस्त्याची नोंद ७-१२ उताऱ्यावर कायमस्वरूपी लागणार
💥रस्त्याबाबत ९० दिवसात निकाल देणे बंधनकारक
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०५२२१७१००५९०१९ असा आहे.
शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल