शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.... शेतरस्त्याची नोंद लागणार आता ७-१२ उताऱ्यावर

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
मुंबई :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,शेतात जाणाऱ्या शेतरस्त्याची नोंद आता ७-१२ थेट उताऱ्यावर इतर हक्कात लागणार आहे.यामुळे शेतातील रस्त्यासंबधात होणारे वाद आता कायमस्वरूपी संपणार आहेत.याबाबत २२ मे २०२५ रोजीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने शेतरस्ता उपलब्ध करून देणे व ७-१२ उताऱ्याच्या इतर हक्क सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी, प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिले आहेत.या शासन निर्णयानुसार 
💥रस्त्याची रुंदी ३ ते ४ मीटर असणे 
💥रस्ता कलम १४३ व कलम ५ नुसार दिलेल्या रस्त्याची नोंद ७-१२ उताऱ्यावर कायमस्वरूपी लागणार
💥रस्त्याबाबत ९० दिवसात निकाल देणे बंधनकारक
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०५२२१७१००५९०१९ असा आहे.
शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वीट जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढणार – गणेश चिवटे

युती आघाडी शिवाय निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आग्रह (करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस चा भव्य मेळावा संपन्न)

भाजपा प्रदेश कार्यालयात गणेश चिवटेंच्या नावाचा बोलबाला....