कोणी कितीही राजकारण करा.. आदिनाथ कारखाना सक्षमपणे फक्त संजयमामाच चालवु शकतात- अशोकराव ऊर्फ राजेंद्रसिंह पाटील

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :- कोणी कितीही राजकारण करा,आदिनाथ कारखाना सक्षमपणे फक्त संजयमामाच चालवु शकतात असे रोखठोक मत सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक  अशोकराव ऊर्फ राजेंद्रसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे. सध्या करमाळा तालुक्यातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस हिन होत असुन, आदिनाथला गर्तेतुन बाहेर काढणे हे एकमेव ध्येय असलेल्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे एकमेव नेतृत्वच आशेचा किरण आहे आदिनाथच्या सभासदांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, विरोधक संजयमामांवर जी टिका टिप्पणी करतात तीच मुळात चुकीची असुन,साखर धंद्यातील आव्हाने आणि सहकाराचा चांगला अभ्यास एकमेव मामांचा आहे. स्वतः भांडवलाची ऊभारणी कशी करायची आणि सरकारची मदत कशी मिळवणार हे फक्त मामाच सांगत आहेत.मात्र विरोधक विरोधासाठी अनेक गोष्टी बेछुट पणे मांडुन लोकांचे मनोरंजन करत आहेत.परंतु आदिनाथची ही निवडणुक सर्वांनी गांभिर्याने घ्यावी लागेल. आदिनाथची मागिल निवडणुक झाली त्यावेळी मामा स्वतः पॅनलचे ऊमेदवार नव्हते परंतु आता स्वतः संजयमामा उमेदवार असुन अतिशय संतुलित पॅनलची निर्मिती केलेली आहे.
        कारखाना चालवण्याचा संजयमामांचा उद्देश स्पष्ट असुन . सन-२०१४ पासुन मामांनी करमाळा मतदारसंघात भरीव कामे केलेली असुन त्याची प्रचिती प्रत्येकाला येत आहेच. मामांना सरकारमधील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे पाठबळ असुन आमदार रोहीतदादा पवार यांची साथ ही जमेची बाजु आहे. एकंदरीत यावेळी आदिनाथचा मतदार नक्कीच स्पष्ट भुमिका असणाऱ्या आणि सक्षम नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजयमामांच्या पाठीशी राहील अशी खात्री वाटते. आपण सर्व मतदारांनी आपले पवित्र मतदान देताना आदिनाथ बचावचा नारा देत मतदान करावे असे आवाहान श्री. अशोकराव पाटील यांनी केले आहे.
       मी स्वतः तसेच सूर्यकांत भाऊ पाटील ,विलास दादा पाटील, तानाजी बापू झोळ, चंद्रहास बापू निमगिरे आम्ही सर्व खंबीरपणे मामांबरोबरच आहोत आमच्या वैयक्तिक कामामुळे अडचणीमुळे आम्ही राज्याच्या बाहेर होतो असे असताना विरोधक संभ्रम पसरवत आहे त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी संजय मामांना साथ द्यावी, येत्या १७ तारखेला महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांना पतंग चिन्हावर मतदान करून  विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल