प्रचारात लोकांची करमणूक करण्याचे बंद करून आदिनाथ कसा चालवणार ?यासाठी विरोधकांनी आमने सामने चर्चा करण्याची हिंमत दाखवावी : मा. आ. संजयमामा शिंदे यांचे खुले आव्हान

(संपादक:-नितीनभाऊ झिंजाडे,🚩रियल न्यूज नेटवर्क्स🔥)
करमाळा :-आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोचला असून यामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे.उमरड येथील प्रचार सभेत महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे पॅनल प्रमुख यांनी विरोधी पॅनल व नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, प्रचारात लोकांची करमणूक करण्याचे बंद करून आदिनाथ कसा चालवणार ?यासाठी विरोधकांनी आमने सामने चर्चा करण्याची हिंमत दाखवावी असे खुले आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे.यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,विरोधक सध्या बाष्कळ गप्पा मारून विरोधक लोकांची करमणूक करत आहेत. आदिनाथ कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याबाबत आपल्याकडे कोणतेही नियोजन नाही,व्हिजन नाही.१७ एप्रिलला श्री आदिनाथ सह.साखर कारखान्याची निवडणुक होत आहे.आदिनाथच्या सत्तेत आळीपाळीने सहभागी झालेल्या विरोधकांनी १९९९-२००० मध्ये कर्जमुक्त झालेला हा कारखाना पुढील काळात कर्जाच्या वाढत्या बोजामुळे अखेर बंद पडला,लिलावात निघाला.तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या जिव्हाळ्याचा, अस्मितेचं प्रतीक असलेला,साईटच्या चारी बाजूला हाकेच्या अंतरावर मुबलक ऊस उपलब्ध असलेला, तालुक्यातील हा पहिला सहकारी कारखाना रसातळाला का गेला याचंही खरं आणि नेमकं उत्तर विरोधकंनी द्यावं.यापुढे तरी कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि कारखान्याला कर्जमुक्त करून पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपल्याकडे काय नियोजन आहे,आपलं काय व्हिजन आहे हे सभासद-मतदाराना
सांगण्याऐवजी विरोधक बिनबुडाचे, निराधार आणि निरर्थक आरोप करून विरोधक त्यांची पूर्वपरंपरा याही निवडणुकीत सुरू ठेवत आहेत. निवडणूक मूळ मुद्द्यापासून दुसरीकडे  भरकटविण्यासाठी बिनबुडाचे आणि आचरट,बालिश,बुद्धीहीन आरोप करून जनतेची करमणूक करण्याऐवजी हिंमत असेल तर समोरासमोर येऊन आदिनाथ पुन्हा सुरू करण्याबाबत आपल्या योजनांबाबत मुद्देसूद चर्चा करावी असे जाहीर आव्हान शिंदे यांनी विरोधकांना केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल