कार्यकर्त्याने आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आल्याने मनाला समाधान मिळाले:पालकमंत्री ना.जयकुमार गोरे

(रियल न्यूज नेटवर्क्स :-संपादक नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा,(स्था.प्रतिनिधी)- भाजपचे कार्यकर्ते गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग मला आल्याने मनाला समाधान मिळाले असल्याची प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे.नामदार गोरे हे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच करमाळा येथे आले होते.यावेळी त्यांनी पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली.श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी 6:25 मि मोठ्या आनंदमयी वातावरणात संपन्न झाला यावेळी ते उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात एकूण २७ नव वधू-वर विवाहबद्ध झाले,यावेळी वधू वरांना विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात आले,या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यासमवेत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,मा. आमदार रामभाऊ सातपुते, मा.आमदार संजयमामा शिंदे, मंगेश चिवटे तसेच गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज,शिवाचार्य वेळापूरकर महाराज,शिवाचार्य माढेकर महाराज, शिवाचार्य परांडेकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते.यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि,गणेश चिवटे हे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांचे सामाजिक कार्य हे आदर्श घेण्याजोगे आहे त्यांनी आज घेतलेला हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम हा कौतुकास्पद आहे.या विवाह सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी दिवसभर वऱ्हाडी मंडळीसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती.करमाळा शहरातून सर्व २७ नवरदेवाची ढोल ताशा,बॅन्जो व फटाक्यांच्या आतिषबाजी करत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.सर्व वधू वरांना वैवाहिक जीवनाबद्दल समुपदेशन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल