लोकसभा निकालाआधीच खा.निंबाळकर ऍक्शन मोडमध्ये (करमाळा दौऱ्यात उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट)

(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - लोकसभा निकालाआधीच खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर निकालाची पर्वा न करता समाजाप्रती सहावेदना व्यक्त करण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.हल्लीच करमाळा दौऱ्यात त्यांनी कुगाव येथे उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या डोंगरे व अवघडे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने शासन दरबारी प्रयत्न करून दुर्घटनाग्रस्त जाधव, डोंगरे आणि अवघडे कुटूंबीयांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना दिली.करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लवकरात लवकर नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशा सूचना दिल्या.
लोकसभा निकालाआधीच खा.निंबाळकर ऍक्शन मोडमध्ये आल्याने त्यांना निवडून येण्याचा आत्मविश्वास असल्याची लोकात चर्चा सुरु आहे.
या दौऱ्यात भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे , चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, वाशिंबेचे सरपंच तानाजी बापू झोळ, उपसरपंच दादासाहेब सरडे, गणेश काळे, सचिन गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिनाथच्या पार्श्वभूमीवर तुफान व्हायरल झालाय हा मॅसेज....

"आदिनाथ" च्या प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचे धाबे दणाणले....! (केम ऊस उत्पादक गटातून आमदार नारायण पाटलांची माघार...तर सुभाष गुळवेही देणार संजयमामानां साथ)

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन ?माजी जि.प.सदस्य विलास राऊत -पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना सवाल