मांगी,रिटेवाडी योजना,जातेगांव टेंभूर्णी रस्त्याच्या प्रश्नासह अनेक प्रश्न मार्गी लावले,प्रालंबीत कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा संधी द्या : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर (बागल संपर्क कार्यालयात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न)
(🚩रियल न्यूज नेटवर्क🔥-नितीनभाऊ झिंजाडे)
करमाळा - मांगी,रिटेवाडी योजना,जातेगांव टेंभूर्णी रस्त्याच्या प्रश्नासह अनेक मार्गी लावल्या,प्रालंबीत कामाच्या पूर्ततेसाठी पुन्हा संधी द्या असे अवाहन माढा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.करमाळा येथील बागल संपर्क कार्यालयात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,
करमाळा तालुका व येथील सर्व मतदार सर्वसामान्य जनता हे माझं एक कुटुंब आहे. करमाळ्यासह सर्व मतदार संघातील विविध विकास कामांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक प्रामाणिकपणे केलेली आहे.माढा लोकसभा मतदारसंघात विकासनिधी खेचून आणण्यात मी अठवा नंबर आणला एवढा विकासनिधी खेचून आणला आहे भविष्यातही विकासनिधी कमी पडू देणार नाही.देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी व आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण पुनश्च एकदा संधी द्यावी. व ती आपण द्याल असा असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी केले.यावेळी ते म्हणाले की,खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघांमध्ये विशेषता करमाळा तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिला व त्यांचा सातत्याने असलेला जनतेशी संपर्क ही त्यांची मुख्यतः जमेची बाजू आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्यामुळे जनता आणि मतदार त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील व आम्ही सर्व पदाधिकारी राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय रश्मी दिदींच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.यावेळी आपल्या भाषणात भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मी बागल म्हणाल्या की,
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला यामध्ये जातेगाव ते टेंभूर्णी या 56 किमी रस्त्याच्या कामासाठी 1234 कोटी रू मंजूर करून आणले आहेत.तसेच रिटेवाडी उपसा सिंचन व माढा तालुक्यातील बेंद ओढ्याच्या कामासंदर्भात मा. खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.त्याही कामाला गती मिळत आहे.असा विश्वास व्यक्त करून करमाळा तालुक्याच्या उर्वरित प्रश्नांचा पाठपुरावा करून भविष्यामध्ये तालुक्याचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गाफील न राहता आज या क्षणापासून कामाला लागायच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपसामध्ये योग्य तो समन्वय व संपर्क ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव व आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतन सिंग केदार यांची समयोचित भाषणे झाली,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपाचे अध्यक्ष चेतनसिंह केदार होते.तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी आभार मानले.या कार्यक्रमास भाजपचे सर्व पदाधिकारी मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे, मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन चिंतामणी जगताप, माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, राज्य निमंत्रित भाजपा सदस्य दिपक चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,शषिकांत पवार,माढा लोकसभा सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे,माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन,जितेश कटारिया, नरेंद्र ठाकूर, प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, महिला मोर्चा करमाळा तालुका अध्यक्ष रेणुका राऊत, लक्ष्मण केकान,माळशिरस तालुका भाजपा विस्तारक संजय घोरपडे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी, बाळासाहेब कुंभार, माजी सभापती भाग्यश्री शिंदे, रसिका महाडिक, सोनाली डावरे, साधनाताई खरात, नगरसेविका राजश्री माने, मकाई चे सर्व संचालक आदिनाथ चे सर्व संचालक नगरसेवक मार्केट कमिटी संचालक भाजपा पदाधिकारी यांचे सह शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर यांनी केले.
टिप्पण्या